सोलापूर : कृषिमंत्री
दत्तात्रय भरणे यांनी आज सोलापूर
जिल्ह्यातील माढा आणि मोहोळ तालुक्यात अतिवृष्टी
पाहणी दौरा केला असता त्यांना शेतकऱ्यांच्या, पूरग्रस्तांच्या आक्रोशाला सामोरे जावे
लागले. कृषिमंत्री पासलेवाडी गावात पाहणीसाठी आले असता, इथे काही मदतकीट वाटण्यात आले. भरपावसात कृषिमंत्र्यांनी माढा तालुक्यातील उंदरगाव माढा या ठिकाणी पाहणी करत शेतकऱ्यांनी चारा आणि जेवणाची अडचण मांडल्यानंतर तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून सुनावलं. तर, वडवळच्या काळे वस्तीत अद्याप बिस्कीटचा एक पुडाही पोहचला नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. दरम्यान, यावेळी सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील
यांना कृषी मंत्र्यांसमोर अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याच दिसून आलं.
लोकांच्या
जेवणाची आणि प्राण्यांसाठी चाऱ्याची व्यवस्था करण्याची सूचना कृषिमंत्र्यांनी केली. शेतकऱ्यावर आलेले
हे खूप मोठे संकट आहे, याची आम्हाला जाणीव आहे. बँकेने शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी तगादा लावू नये, यासाठीही सूचना दिल्या जातील असे
भरणे यांनी सांगितले. नुकसानग्रस्त भागात तातडीने 5000 रुपये आणि इतर मदत पोहोचवली जाईल, असेही कृषिमंत्री म्हणाले. मात्र, अद्यापही मदतीची केवळ घोषणाच होत
असल्याचं दिसून येत आहे. पूरग्रस्त आणि शेतकऱ्यांपर्यंत कुठलीही मदत पोहोचली नसल्याने त्यांचा संताप पाहायला मिळत आहे.
मोहोळमध्ये कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा ताफा शेतकऱ्यांनी अडवल्याचं पाहायला मिळालं. मोहोळ तालुक्यातील वडवळ गावच्या शेतकऱ्यांनी ताफा अडवत कृषिमंत्र्यांसमोर गाऱ्हाणं मांडल. वडवळच्या काळेवस्तीपर्यंत अद्याप कोणतेही खाण्यापिण्याचे साहित्य पोहचले नसल्याची गावकरी, शेतकऱ्यांनी तक्रार केली. यावेळी अधिकाऱ्यांनी प्रत्येक गावात घुसून पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आला.
एक बिस्कटचा पुडाही
मिळाला नाही
वडवळच्या काळे वस्तीत अद्याप बिस्कीटचा एक पुडाही पोहचला नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. दादा, नमस्कार
मी संभाजी बेंद्र नावाचा सरपंच आहे माझ्या गावात. माझ्या घरावर
20 फूट पाणी आहे, मला एक बिस्कीटचा पुडा सुद्धा मिळाला नाही. माझ्या शेजाऱ्याला विचारा,
असे म्हणत एका पूरग्रस्त पीडित ग्रामस्थाने आपली व्यथा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या दौऱ्यात मांडली. त्यावेळी,
उपस्थित अधिकारी मात्र गेल्या तीन दिवसांपासून आम्ही अन्नधान्य पोहोचवत आहोत, असे
सांगत होते. त्यामुळे, संतापलेल्या उमेश पाटील यांनी, अधिकाऱ्यांना जाब विचारला. तुम्ही म्हणता पोहोचलंय, पोहोचलंय, काय घंटा पोहोचलंय,
असा संतप्त सवाल त्यांनी केला.
कृषि मंत्र्यांसमोर
शेतकऱ्याला हुंदका अनावर
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
हे आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत,यावेळी मोहोळ तालुक्यातील पासलेवाडी गावात पहाणी करायला आलेला असताना स्वतःची व्यथा मांडताना हुंडका दाटून आला तेंव्हा कृषी मंत्री भरणे यांनी शेतकऱ्याला जवळ घेत काळजी करू नका, सरकार तुमच्या बरोब आहे, असं म्हणत
दिलासा दिला. दरम्यान, सीना-कोळेगाव धारणातून अनियांत्रित पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. याबाबत भविष्यामध्ये कोणामुळे नुकसान
झालं आहे, याची चौकशी करून महसूल, कृषी, ग्रामविकास, जलसंपदा विभागातील जो कोणी चुकला असेल आणि हलगर्जीपणा केलेला असेल त्याचा शासन
वेगळा विचार करेल आणि चौकशी समिती नेमून त्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहितीही भरणे यांनी दिली.
Post a Comment