तुळशीचे रोप लावताना लक्षात ठेवा हे नियम! नशीब बदलेल


 
तुळस म्हणजे हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि पुजनीय रोप म्हणून ओळखले जाते. माता लक्ष्मीचे रुप म्हणजे तुळस असेही म्हणतात. ज्या घरात तुळशीची दररोज पुजा केली जाते तिथे धनधान्य, सुखसमृद्धी कायम असते असे म्हणतात. तुळशीची पूजा केल्यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत असतो. तुम्ही घरात तुळस लावत असाल किंवा तुमच्या घराती तुळस आहे तर त्यासंदर्भात काय काळजी घ्यावी. ज्योतिष शास्त्र आणि वास्तुशास्त्र यांच्या दृष्टीकोनातून काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात, त्याबदद्ल जाणून घेऊया.

तुमच्या घरी तुळशीचं रोप नसेल आणि तुम्हाल तुळस लावायची आहे तर सर्वोत्तम महिना म्हणजे कार्तिक ! जर कार्तिक महिन्यात तुळस घरी लावली तर माता लक्ष्मीचे आगमन होते असे म्हणतात. तुळस लावण्याचा शुभ दिवस म्हणजे गुरूवार, हा भगवान विष्णूंचा दिवस आहे आणि तुळस त्यांना अतिशय प्रिय आहे.
तुळस अंगणात ठेवावी पण सध्या जागेचा प्रश्न यामुळे बाल्कनी, खिडकी किंवा छतावर तुळस ठेवू शकता, पण वास्तुशास्त्रात सांगतलेल्या दिशांचे भान ठेवायला हवे. तुम्ही जिथे तुळशीचे रोपटे ठेवता ती जागा स्वच्छ असावी हे लक्षात ठेवा.

तुळस मातीच्या कुंडीत लावायला हवी. प्लास्टिकच्या कुंडीत शक्यतो तुळस लावणे टाळावे. तुळस लावल्यानंतर तिची नियमीत पूजा करायला हवी. संध्याकाळी तुळशीला स्पर्श करणे वर्जित मानले जाते. एकादशी, रविवार, चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, अमावस्या या दिवशी तुळशीला हात लावू नये किंवा तुळशीची पाने तोडू नये.
हळद-कुंकू लावून तुळशीची पूजा करतात. तुळशीला पाणी घालताना त्यात कच्चे दूध मिसळून अर्पण केल्यास घरातील आर्थिक अडचणी कमी होतात अशी मान्यता आहे.तुळशीला पाणी अर्पण करताना ३ वेळा प्रदक्षिणा घाला. प्रथम सूर्याला जल अर्पण करा आणि त्यानंतर तुळशीला पाणी घाला.

तुळशीचे पान गणपती आणि शिवशंकर यांच्या व्यतिरिक्त इतर सर्व देवी-देवतांना अर्पण केले जाऊ शकते.तुळस ही बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करते, ज्याला भगवान श्रीकृष्णाचेच एक रूप मानले जाते. म्हणून तर तुम्ही पाहिले असेल तुळशीवृंदावनाला गेरुचा रंग देवून त्यावर श्रीकृष्ण असे लिहितात.
तुळशीला अनेकजण लाल ओढणी अर्पण करतात, पण लाल रंग मंगळाचा असून तुळसतर बुध ग्रहाचे प्रतिनिधीत्व करते त्यामुळे तुळशीला श्वेत रंगाची किंवा निळ्या रंगाची ओढणी अर्पण करावी.

वास्तुशास्त्रानुसार तुळस नेहमी घराच्या उत्तर किंवा उत्तर-पूर्व म्हणजे ईशान्य दिशेला लावायला हवी. तुम्ही चुकूनही तुळस दक्षिण दिशेला ठेवू नका. कारण दक्षिण दिशा पितरांची मानली जाते, तिथे तुळस ठेवल्याने मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.

समजा तुम्हाला घरात एकापेक्षा जास्त तुळशीची रोपे ठेवायची असतील तर विषम संख्येत ठेवा. १, ३ किंवा ५ पण सम संख्येत तुळस घरात ठेवू नये.
समजा तुळशीचे रोप वाळले आहे. त्याला एकही पान येत नाही तर अशी तुळस घरात ठेवू नका. वाहत्या पाण्यात विसर्जीत करावी.
अगदी छोटेसे तुळशीचे रोपटे नक्की घरात असावे. तुमच्या घरी तुळस असेल तर या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, म्हणजे समस्या कमी होतील आणि सुखसमृद्धी नांदेल.

0/Post a Comment/Comments