ऑपरेशन सिंदूर सुरूच... पाकिस्तानी हल्ल्याला भारताचे जोरदार प्रत्युत्तर, गुरुवारी केले ड्रोन हल्ले


 
नवी दिल्ली - पाकिस्तानने भारतावर केलेल्या हल्ल्याला भारताने चोख उत्तर देत ड्रोन हल्ले करत लाहोरसह अनेक ठिकाणच्या एअर डिफेन्स सिस्टिम निष्क्रिय केल्याची माहिती भारतीय लष्कराने दिली. पाकिस्तानने भारतातील 15 शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण भारताने तो हल्ला उधळवून लावला आणि प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानच्या रडार यंत्रणा निष्किय करुन दिला असल्याची माहिती देण्यात आली. भारताच्या या कारवाईची माहिती कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह आणि परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी गुरुवारी (दि.8) सायंकाळी दिली.

भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानच्या कोणत्याही नागरी भागावर हल्ला केला नव्हता. पाकिस्तानने जर भारतावर हल्ला केला तर त्याला उत्तर देणार असं भारताने स्पष्ट केलं होतं. त्यानंतर अमृतसर,अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोटसह  भारताच्या 15 शहरांवर पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न केला. पण भारताने त्याला उत्तर देत तो हल्ला निष्क्रिय केला. 

त्यानंतर भारताने पाकिस्तानच्या काही ठिकाणच्या रडार यंत्रणा निष्क्रिय केली. त्यामध्ये लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टिम नष्ठ करण्यात आली.
पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर गोळीबार आणि तोफांचा हल्ला केला. त्यामध्ये कुपवाडा, बारामुल्ला, उरी, पुंछ या ठिकाणांचा समावेश आहे. त्यामध्ये 16 नागरिकांचा मृत्यू झाला. तीन महिलांचा त्यामध्ये समावेश आहे.

पाकिस्तानकडून वारंवार सीमाभागत शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. त्यामध्ये भारताच्या सर्वसमान्य नागरिकांचा जीव जात आहे. पण भारताने केलेल्या हल्ल्यात कोणत्याही पाकिस्तानी सर्वसमान्य नागरिकाचा जीव जात नाही. भारताने फक्त दहशतवादी तळांवर हल्ला केला.

संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, पाकिस्तानने उत्तर आणि पश्चिम भारतातील शहरांनाही लक्ष्य केले. या काळात अवंतीपोरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज येथे ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागण्यात आली. हे देखील उधळून लावण्यात आले.

भारतीय लष्कराने रशियाकडून मिळवलेली S-400 हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली आधीच सीमेवर तैनात केली आहे आणि पाकिस्तानने क्षेपणास्त्रांनी हल्ला करताच ही प्रणाली सक्रिय करण्यात आली.

संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, गुरुवारी सकाळी पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यांनंतर, भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील अनेक ठिकाणी हवाई संरक्षण रडार आणि प्रणालींना लक्ष्य करण्यासाठी हार्पी ड्रोनचा वापर केला. भारताची कारवाई पाकिस्तानच्याच क्षेत्रात आणि त्याच वेगाने करण्यात आली आहे. लाहोर, सियालकोट, कराची येथील हवाई संरक्षण प्रणाली नष्ट झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments