केरळमधील
मालविका नायर यांनी जिद्द आणि चिकाटीच्या बळावर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या
(यूपीएससी) परीक्षेत यश मिळवले आहे. बाळाचा जन्म झाल्यानंतर अवघ्या 17 दिवसांनी
यूपीएससीची मुख्य परीक्षा दिली आणि 2024 मध्ये ऑल इंडिया रँक 45 मिळवली.
यापूर्वी 2022 मध्ये त्यांनी 172 वा
रँक मिळवून भारतीय राजस्व सेवेत (IRS) स्थान मिळवले होते. मात्र, आयएएस
(IAS) अधिकारी
बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी पुन्हा परीक्षा दिली आणि यश संपादन केले.
मालविका नायर
यांच्या यशाची कहाणी अनेक यूपीएससी परीक्षार्थींसाठी प्रेरणादायी आहे. मालविका
नायर केरळमधील अलप्पुझा जिल्ह्यातील चेंगन्नूरच्या रहिवासी आहेत. मालविका नायर
यांनी दोन वेळा यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. 2022 मध्ये
त्या 172 व्या
रँकने उत्तीर्ण झाल्या आणि त्यांना भारतीय राजस्व अधिकारी (IRS) पद
मिळाले. मात्र, मालविका यांचे ध्येय आयएएस अधिकारी
बनण्याचे होते. त्यामुळे त्यांनी पुन्हा 2024 मध्ये परीक्षा दिली आणि 45 वा
रँक मिळवला.
"कुटुंबाच्या मदतीमुळेच हे करू शकले"
नायर
म्हणाल्या, "मी खूप आनंदी आहे की माझे
नाव रँक लिस्टमध्ये आले, देवाचे
आभार. IAS बनण्यासाठी माझा हा
शेवटचा प्रयत्न होता." तसेच त्या पुढे म्हणाल्या, "हे खूप कठीण प्रयत्न होते. गेल्या वर्षी जेव्हा मी पूर्व
परीक्षा देत होते, तेव्हा मी गर्भवती होते.
आरोग्याच्या आघाडीवर अनेक अडचणी होत्या. माझ्या मुलाचा जन्म 3 सप्टेंबरला झाला आणि मी 20 सप्टेंबरला मेन्स परीक्षा दिली. मी माझ्या कुटुंबाच्या
मदतीमुळेच हे करू शकले."
जिद्द
आणि चिकाटीच्या जोरावर काहीही शक्य
मालविकाने सांगितले की, गेल्या काही वर्षांतील परीक्षा देण्याच्या अनुभवामुळे तिला
खूप मदत झाली. मालविकाचे पती नंदगोपन एम हे आयपीएस आहेत. यूपीएससी परीक्षा ही
भारतातील सर्वात मोठी आणि कठीण परीक्षा मानली जाते. अनेक उमेदवार या परीक्षेत यश
मिळवण्यासाठी कठोर परिश्रम घेतात. मालविका नायर यांनी हे सिद्ध केले आहे की, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर काहीही शक्य आहे. त्यांच्या
यशाने अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली आहे.
कठोर परिश्रमाचे आणि समर्पणाचे प्रतीक
'यश एका दिवसात मिळत नाही, पण ध्येय निश्चित केले तर एक दिवस नक्की मिळते', हे मालविका नायर यांच्या उदाहरणावरून सिद्ध होते. मालविका
नायर यांनी आपल्या मुलाच्या जन्मानंतर लगेचच परीक्षा देऊन एक नवा आदर्श निर्माण
केला आहे. त्यांच्या संघर्षातून आणि जिद्दीतून यूपीएससीची तयारी करणाऱ्या प्रत्येक
विद्यार्थ्याला प्रेरणा मिळेल. त्यांच्या यशाची कहाणी निश्चितच अनेकांना
प्रोत्साहित करेल. मालविका नायर यांचे यश हे त्यांच्या कठोर परिश्रमाचे आणि
समर्पणाचे प्रतीक आहे. त्यांनी हे सिद्ध केले आहे की, कोणतीही परिस्थिती असली तरी ध्येय गाठता येते. त्यांच्या
यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Post a Comment